भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्काच्या लढ्याला यश; शेकडो प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर
चालढकल केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार' - नगरसेवक महेश शिंदे

प्रतिनिधी सचिन उगाडे9970560908
माळशिरस. तालुक्यातील भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या (VJNT) बांधवांच्या प्रलंबित असलेल्या जातीच्या दाखल्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या निर्णयाचे स्वागत करत, आज नगरसेवक महेश लक्ष्मी केशव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हक्काचे सर्व प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेबांकडे रितसर जमा करण्यात आले. लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून जातीच्या दाखल्यांसाठी भटक्या-विमुक्त समाजातील बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कागदपत्रांच्या तांत्रिक बाबींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान होत होते. या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता प्रक्रिया वेगवान होण्याची चिन्हे आहेत.प्रस्ताव सादर: तालुक्यातील भटक्या-विमुक्त समाजाच्या पात्र लाभार्थ्यांचे सर्व अर्ज आज तहसील कार्यालयात सुपुर्द करण्यात आले.

प्रशासनाचा प्रतिसाद: तहसीलदार कार्यालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
हक्काचा लढा: हा केवळ प्रशासकीय सोपस्कार नसून समाजाच्या अस्मितेचा आणि हक्काचा लढा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
”आज आम्ही सर्व प्रस्ताव प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. हा आमच्या लढ्यातील एक मोठा विजय आहे. परंतु, प्रशासनाने या प्रक्रियेत कोणतीही चालढकल किंवा विलंब केल्यास ते सहन केले जाणार नाही. जर बांधवांच्या हक्कासाठी गरज भासली, तर पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे ‘अन्नत्याग आंदोलन’ उभारण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”
महेश लक्ष्मी केशव शिंदे (नगरसेवक)







